नमस्कार मंडळी,
तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या छोट्याश्या ब्लॉग वरती मनःपूर्वक स्वागत आहे.
आज म्हणले काहीतरी नवीन चालू करूया.
अजून संशोधकांना सुद्धा न समजणारे कोडे म्हणजेच आपले 'मन' किंवा पुलं म्हणतात तसे सर्वात स्वस्त एअरलाईन्स म्हणजेच 'मन' ह्याची सफर आपण करूया.
चला तर मग सुरुवात करू.
मन,
हे नक्की मंदिर आहे की कत्तलखाना?
इथे विचारांची पूजा होते की विचारांची भावना लक्षात न घेता त्यांचे कत्तल होते.
समजा आपण तोंड उघडले नाही किंवा हातापायांची हालचालच नाही केले तर ते शांत बसू तरी शकतात पण 'मन' कधी शांत बसले आहे का?
पटत नसेल तर २ मिनिटे शांत बसून पहा,
बसत नाही ना शांत?
विचारांची खेळी झाली किंवा २ विचार एकमेकांच्या समोर आले तर आपली गोची होते व आपण म्हणतो की आपले डोके दुःखायला लागले.
पण खरे असे होते तरी का?
आपणच जास्ती विचार करून स्वतःच्याच विचार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जातो की दुसऱ्याने लादलेल्या विचारात गुरफटून जाऊन दबून जातो?
मला तर वाटते ह्यापैकीच एखादे कारण असावे आपल्या डोकेदुखीचे.
निसर्गाकडून मानवाला मिळालेली मन एक अमूर्त देणगी तर आहेच त्यासोबत मन हे एक बेधुंद, बेधडक व बुद्धिमान शस्त्र आहे ज्याच्या 'मनमार्गा' (मनाचा मार्ग) वर राहून आपण 'यशाचे' शिखर पादाक्रांत करूया.
बाकी कसे आहात?
मजेत ना?
आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे.
भेटू पुढच्या भागात.
क्रमशः...
~अज्ञेय...
तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या छोट्याश्या ब्लॉग वरती मनःपूर्वक स्वागत आहे.
आज म्हणले काहीतरी नवीन चालू करूया.
अजून संशोधकांना सुद्धा न समजणारे कोडे म्हणजेच आपले 'मन' किंवा पुलं म्हणतात तसे सर्वात स्वस्त एअरलाईन्स म्हणजेच 'मन' ह्याची सफर आपण करूया.
चला तर मग सुरुवात करू.
मन,
हे नक्की मंदिर आहे की कत्तलखाना?
इथे विचारांची पूजा होते की विचारांची भावना लक्षात न घेता त्यांचे कत्तल होते.
समजा आपण तोंड उघडले नाही किंवा हातापायांची हालचालच नाही केले तर ते शांत बसू तरी शकतात पण 'मन' कधी शांत बसले आहे का?
पटत नसेल तर २ मिनिटे शांत बसून पहा,
बसत नाही ना शांत?
विचारांची खेळी झाली किंवा २ विचार एकमेकांच्या समोर आले तर आपली गोची होते व आपण म्हणतो की आपले डोके दुःखायला लागले.
पण खरे असे होते तरी का?
आपणच जास्ती विचार करून स्वतःच्याच विचार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे जातो की दुसऱ्याने लादलेल्या विचारात गुरफटून जाऊन दबून जातो?
मला तर वाटते ह्यापैकीच एखादे कारण असावे आपल्या डोकेदुखीचे.
निसर्गाकडून मानवाला मिळालेली मन एक अमूर्त देणगी तर आहेच त्यासोबत मन हे एक बेधुंद, बेधडक व बुद्धिमान शस्त्र आहे ज्याच्या 'मनमार्गा' (मनाचा मार्ग) वर राहून आपण 'यशाचे' शिखर पादाक्रांत करूया.
बाकी कसे आहात?
मजेत ना?
आपल्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे.
भेटू पुढच्या भागात.
क्रमशः...
~अज्ञेय...
छान मित्रा👌👍
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
Deleteआपले शुभ नाव कळू शकेल का?
👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
Deleteआपले शुभ नाव कळू शकेल का?
अप्रतिम
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
Deleteआपले शुभ नाव कळू शकेल का?
👌👌👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद...
Delete